Wednesday, January 12, 2011

Gurucharitra - Adhyay 20

Chapter 20 Shri Guru saves a woman from a ghost and blesses her with two sons. When one of them dies, he condoles her with lot of philosophy.

CHAPTER 20

A Brahmani Relieved from Brahmahatya and gets Issues.

Gangahar, a Vedic-Brahmin lived at Shirol. His wife was devoted and good-natured. But the misery was that she had no children. She got issues but they all died after birth in the childhood. She got issues but they all died after birth in the childhood. She observed fasts and vratas, but they bore no fruit.

Some Brahmins said, `This is due to the sin of the previous birth. Those who commit abortions become sterile. Those who kill a cow or a horse and take other's wealth, have no issues in the next birth.'

One brahmin told her `You took some money from a Brahmin of Shounak Gotra. He asked you to pay the money many times and at last he committed suicide. He spirit does not allow your issues to live.'

The brahmin was very sorry to know this. She requested the Brahmin to suggest means to get relief from the spirit trouble.

The Brahmin said, `After the death of the Brahmin his death rituals were not performed. You go to the bank of Krishna, observe fast for one month, bathe in the Papvinashi and worship Audumhar for 7 days, do abhishek to Shri Guru, bathe in the Kamya Tirth and give Rs.100/- to a Brahmin of Shounak Gotra and observe the death rituals of the Brahmin. Then Shri Guru will protect you.'

The Brahmin said to her, `Shri Guru lives at the Audumbar. He protects his devotees from all the miseries. You spend money as per your circumstances on the advice of Shri Guru.'

The Brahmini went to the place. Bathing in the Papvinashi, she took rounds of the Audumber. Bathing in the Kamya Tirth she worshipped Shri Guru and observed fast. After 3 days the Shounak Gotra Brahmin came in her dream and began to thrash her. She took shelter of the Audumbar tree. Shri Guru appeared and asked the Brahmin why he was beating the Brahmani. Hearing what the Brahmin told, Shri Guru said, `If you haras my devotee, I shall punish you. Accept whatever this Brahmani offers to you and leave her. Mind if you again harass her.'

The Brahmin's spirit bowed to Shri Guru and said, `It is my good fortune that I could see you. I shall act as per your order. Kindly liberate me.'

Shri Guru told the Brahmini, `You give the money you have, in charity in the name of the Brahmin's spirit, `Shri Guru told the spirit. `After the rituals of 10 days, you shall be free from this life.'

When the Bramani had wworshipped the Audumbar for 7 days, Shri Guru came in her dream and said, `All your sins are wiped off. You will now have sons and daughters. Who will have long life.'

She acted as asked by Shri Guru for 10 days. Her sin of Brahmahatya was wiped off and the spirit of the Brahmin was liberated from the spirit life. On the last day Guru appeared in her dream and placed two cocoanuts in her sari and a sked her to do the last function (Udyapan) of her vrat.

The Brahmin couple worshipped Shri-Guru with devotion. Shri Guru appeared before them. The Brahmin got two sons in course of time.

Thread ceremony of the first son was duly celebrated. Chout (shaving the hair on the head) ceremony of the second was to be performed; but the boy fell sick due to titanus and died on the thrid day after great suffering. The parents began to weep in grief.

The Brahmani said, `Shri Guru, you are the donor of true and real things. I believed in your words. How did this happen? Due to the sin of Brahmahatya I took your shelter. Due to the fear of a tiger a cow goes to a Muslim and he kills the cow. Similar has been my case.

Next morning the brahmins of the place tried to console her and demanded the corpse of the boy for funeral; but she held the corpse of her son at bosom and refused to give it and said, `Burn me also with this corpse.'

The Brahmins said, `Does mother give her life with that of a son? How foolish you are! Besides, to comit suicide is a great sin'. It was afternoon; but she did not part with the corpse. In the meantime a Sanyasi came there and began to advise her.'

Contd.....


श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्री गुरुभ्यो नम: ॥

नामधारक शिष्यराणा । लागे सिध्दचिया चरणा । विनवीतसे कर जोडून । भक्तिभावेंकरूनि ॥१॥

पुसतसे तयावेळी । माथा ठेवोनि चरणकमळी । जय जया सिध्द-स्तोममौळी । विनंति एक अवधारा ॥२॥

स्वामी निरोपिलें आम्हांसी । श्रीगुरु आले गाणगापुरासी । गौप्यरूपें अमरापुरासी । औदुंबरी असती म्हणतां ॥३॥

वर देऊनि योगिनींसी । आपण आले प्रकटेसी । पुढे तया स्थानी कैसी । विस्तार झाला तें निरोपावें ॥४॥

वृक्ष सांगसी औदुंबर । निश्चयें म्हणसी कल्पतरु । पुढे कवणा झाला वरु । निरोपावे दातारा॥५॥

शिष्यवचन ऐकोनि । संतोषला सिध्दमुनि । सांगतसे विस्तारुनि । औदुंबरास्थानमहिमा ॥६॥

सिध्द म्हणे ऐक बाळा । किती सांगूं गुरुची लीळा । औदुंबरी सर्वकाळ । वास आपण असे जाणा ॥७॥

जया नाम कल्पतरु । काय पुससी तयाचा वरु । जेथे वास श्रीगुरु॥ कल्पिलें फळ तेथें होय ॥८॥

अमित झाला तेथें महिमा । सांगावया अशक्य आम्हां । एखादा सांगो दृष्टांत तुम्हां । शिष्योत्तमा नामधारक ॥९॥

'शिरोळे' म्हणिजे ग्रामेसी । विप्र एक परियेसीं । 'गंगाधर' नाम ऐसी । वेदरत होता जाणा ॥१०॥

त्याची भार्या पतिव्रता । शांत असे सुशीलता । तिसी पुत्र होती ते सर्वेचि मृत्युता । कष्टतसे येणेंपरी ॥११॥

पांच पुत्र तिसी झाले । सर्वेचि पंचत्व पावले । अनेक देव आराधिले । नव्हे कवणेपरी स्थिर ॥१२॥

दु:ख करी ते नारी । व्रत उपवास अपरांपरी । पूर्वकर्म असे थोरी । स्थिर नोहे पुत्र तिसी ॥१३॥

रहणी कर्मविपाकेसी । विचार करिती तिच्या दोषासी । पुत्रशोक व्हावयासी । सांगती पातकें तये वेळी ॥१४॥

सांगती विप्र विद्वज्जन । पुत्र न वांचती काय कारण । पूर्वजन्म-दोषगुण । विस्तार करिती तियेसी ॥१५॥

गर्भपात स्त्रियांसी । जे जन करिती तामसी । पावती वांझ-जन्मासी । झाले पुत्र मरती जाणे ॥१६॥

अश्ववध गोवध करी । वांझ होय सदा ज्वरी । एकदा परद्रव्य अपहारी । अपुत्री होय तो जाणा ॥१७॥

विप्र म्हणती तियेसी । तुझे पूर्वजन्म-दोषी । दिसतसे आम्हांसी । सांगूं ऐका एकचित्ते ॥१८॥

शोनेकगोत्री द्विजापाशीं । रीण घेतले द्रव्यासी । मागता तुवां न देसी । कष्टला बहुत तो ब्राह्मण ॥१९॥

लोभी होता तो ब्राह्मण । द्रव्यसंबंधे दिधला प्राण । आत्महत्या केलिया गुणें । तो पिशाच झाला असे ॥२०॥

गर्भपात करी तो तुज । जाहल्या मृत्यु करी तो द्विज । तुझें कर्म असे सहज । आपली जोडी भोगावी ॥२१॥

ऐकोनी ब्राह्मणाचे वचन । विप्रवनिता खेदे खिन्न । अनुतप्त होऊनि अंत:करण । द्विजचरणा लागली ॥२२॥

कर जोडोनि तये वेळी । विनवीतसे करुणाबहाळी । माथा ठेवूनि चरणकमळी । पुसतसे तयावेळी ॥२३॥

ऐसी पापिणी दुराचारी । बुडाल्यें पापाचे सागरी । स्वामी मातें तारी तारी । उपाय सांगणे म्हणतसे ॥२४॥

ऐसी पापें हळाहळी । अपत्ये भक्षिली चांडाळी । औषधी सांगा तुम्ही सकळी । म्हणोनी सभेसी विनवीतसे ॥२५॥

विप्र म्हणती तियेसी । तुवां केली ब्रह्महत्या दोषी । अपहारिलें द्रव्यासी । ब्राह्मण पिशाच जाहला असे ॥२६॥

जधी मेला द्विजवर । केली नाहीं क्रियाकर्म-पर । त्याचें द्रव्य तुवां सारें । भोगिलें असे जन्मांतरी ॥२७॥

त्यासी करणें उध्दारगति । सोळावें कर्म करावें रीतीं । द्रव्य द्यावें एकशती । तया गोत्रद्विजासी ॥२८॥

तेणें होय तुज बरवें । एकोभावें आचरावें । कृष्णतीरी वास करावें । एक मास उपवासी ॥२९॥

पंचगंगासंगमेसी । तीर्थे असती बहुवसी । औदुंबरवृक्षासी । आराधावें परियेसा ॥३०॥

पापविनाशी करुनी स्नान । वेळ सात औदुंबरस्नपन । अभिषेकोनि श्रीगुरुचरण । पुन्हा स्नान काम्यतीर्थी ॥३१॥

विधिपूर्वक श्रीगुरुचरणीं । पूजा करावी भावोनी॥ येणेंपरी भक्तीने । मास एक आचरावें ॥३२॥

स्थान असे श्रीगुरुचें । नरसिंहसरस्वतीचें । तुझे दोष जातील साचे । पुत्र होतील शतायुषी ॥३३॥

मास आचरोनी येणेंपरी । मग ब्राह्मणातें पाचारीं । द्रव्य द्यावें शौनकगोत्री । द्वीजवरासी एक शत ॥३४॥

त्याचेनि नामें कर्म सकळ । आचरावें मन निर्मळ । होतील तुझे कष्ट सफळ । श्रीगुरुनाथ तारील ॥३५॥

गुरुस्मरण करूनि मनीं । तूं पूजा करीं वो गुरुचरणीं । तुझें पाप होईल धुणी । ब्राह्मणसमंध परिहरेल ॥३६॥

ऐसें सांगतां द्विजवरीं । ऐकोनि सती चिंता करी । शतद्रव्य आमुच्या घरीं । कधीं न मिळे परियेसा ॥३७॥

कष्ट करीन आपुले देहीं । उपवासादि पूजा पाहीं । मासोपवास एकोभावीं । करीन आपण गुरुसेवा ॥३८॥

येणेंपरी तये नारी । सांगे आपुले निर्धारीं । ऐकोनियां द्विजवरीं । निरोप देती तये वेळी ॥३९॥

विप्र म्हणती ऐक बाळे । तूर्ते द्रव्य इतुकें न मिळे । सेवा करीं वो मननिर्मळें । श्रीगुरुचरणीं तूं आतां ॥४०॥

निष्कृति तुझिया पापासी ।श्रीगुरु करील परियेसीं। औंदुबरसंनिधेंसी । वास असे निरंतर ॥४१॥

तो कृपाळू भक्तांसी । निवारील ब्रह्महत्यादोषासी । जितुकें येईल तुझ्या शक्तीसी । द्रव्य वेंची गुरुनिरोपें ॥४२॥

परिसोनि द्विजवचन । विप्रवनिता संतोषोन । गेली त्वरित ठाकोन । जेथें स्थान श्रीगुरूचें ॥४३॥

स्नान करूनि संगमासी । पापविनाशीं विधीसीं । सात वेळ स्नपनेसीं । करी औदुंबरी प्रदक्षिणा ॥४४॥

काम्यतीर्थी करूनि स्नान । पूजा करूनि श्रीगुरुचरण । प्रदक्षिणा करूनि नमन । करीतसे उपवास ॥४५॥

येणेंपरी दिवस तीनी । सेवा करितां ते ब्राह्मणी । आला विप्र तिच्या स्वप्नीं । द्रव्य मागे शत एक ॥४६॥

अद्यापि जरी न देसी । घेईन तुझे प्राणासी । पुढें तुझ्या वंशासी । वाढों नेदीं अवधारीं ॥४७॥

वायां करिसी तूं सायासी । पुत्र कैंचे तुझे वंशी । म्हणोनि कोपें मारावयासी । आला पिशाच स्वप्नांत ॥४८॥

भयचकित ते वनिता । औदुंबराआड रिघतां । तंव देखिलें श्रीगुरुनाथा । तयापाठीं रिघाली ॥४९॥

अभय देवोनि नारीसी । वारिता झाला ब्राह्मणासी । पुसती श्रीगुरु तयासी । कां मारिसी स्त्रियेसी ॥५०॥

विप्र विनवी श्रीगुरूसी । "जन्मांतरी आपणासी । अपहार केला द्रव्यासी । प्राण त्यजिला यास्तव ॥५१॥

स्वामी कृपाळू सर्वांसी । आमुचे शत्रूचा पक्षपात करिसी । तुंही यतीश्वर तापसी । पक्षपात करूं नये " ॥५२॥

ऐकोनि तयाचें वचन । श्रीगुरु म्हणती कोपोन । "उपद्रव देसी भक्तजना । तूंतें शिक्षा करूं जाण ॥५३॥

आम्ही सांगों जेंणें रीती । जरी ऐकसी हितार्थी । तुज होईल सद्गति । पिशाचत्व परिहरेल ॥५४॥

जें काय देईल विप्रवनिता । तुवां अंगिकारावें सर्वथा । जरी न ये तुझ्या चित्ता । जाईं आतां येथोन ॥५५॥

राखीव माझिया भक्तांसी । वंशोवंशी अभिवृध्दीसीं ; । पुनरपि जरी पाहूं येसी । शिक्षा करूं " म्हणती गुरु ॥५६॥

ऐकोनि श्रीगुरुचें वचन । विप्र-पिशाच करी नमन । " स्वामी तुझे देखिले चरण । उध्दरावें आपणासी ॥५७॥

जेणेंपरी आपणासी । होय गति उध्दरावयासी । निरोप देसी करुणेसीं । अंगिकारूं स्वामिया " ॥५८॥

श्रीगुरु म्हणती तयासी । विप्रवनिता भावेसीं । करील कर्म दहा दिवशी । गति होईल तूतें जाणा ॥५९॥

येणेंपरी तयासी । निरोप देती स्त्रियेसी । जें असेल तुजपाशी । आचरीं कर्म तया नामीं ॥६०॥

अष्टतीर्थी स्नान करी । तया नामें अवधारीं । सात दिवस येणेंपरी । स्नपन करीं औदुंबरा ॥६१॥

ब्रह्महत्या तुझे दोषी । जातील त्वरित भरंवसी । कन्या पुत्र पूर्णायुषी । होतील म्हणती श्रीगुरु ॥६२॥

ऐसें देखोनि जागृतीं । विप्रवनिता भयचकिती । ज्ञाने पाहे श्रीगुरुमूर्ति । न विसंवे मनांत ॥६३॥

श्रीगुरुनिरोपें दहा दिवस । केलें आचरण परियेस । ब्रह्महत्या गेला दोष । गति झाली ब्राह्मणासी ॥६४॥

येरे दिवशी स्वप्नांत । प्रत्यक्ष आले श्रीगुरुनाथ । नारिकेल दोन देत । भरली ओंटी तियेची ॥६५॥

म्हणे पारणें करीं वो तूं आतां । पुत्र होतील वेदरता । वाढे त्यांची संतति बहुता । चिंता न करीं अहो बाळे ॥६६॥

गुरुनिरोपें आराधन । करिती दंपती मन:पूर्ण । प्रकट झाला श्रीगुरुराणा । संपर्क लोह-परिसापरी ॥६७॥

गुरुनिरोपें आराधन । करिती दंपती मन:पूर्ण । प्रकट झाला श्रीगुरुराणा । संपर्क लोह परिसापरी ॥६८॥

पुढें तया नारीसी। पुत्रयुग्म सद्वंशी । झाले श्रीगुरुकृपेसीं । एकचित्तें परियेसा ॥६९॥

व्रतबंध करिती ज्येष्ठासी । समांरंभ अनंत हर्षी । चौलकर्म दुजियासी । करूं पहाती मातापिता ॥७०॥

समारंभ करी जननी । चौलकर्म करणें मनीं । पुत्रासी जाहली वर्षे तीन्ही । अत्योल्हास मानसीं ॥७१॥

समारंभ अतिप्रीतीं । करिती झाली आयती । पूर्व दिवसी मध्यरात्रीं । आली व्याधि कुमरासी ॥७२॥

व्याधि असती अष्टोत्तर । एकाहूनि एक थोर । तयामध्यें जो का तीव्र । धनुर्वात तयासी ॥७३॥

अवयव वांकोनि । दिसे भयानक नयनी । येणेपरी दिवस तीन्ही । कष्टातसे तो बाळ ॥७४॥

तया दिवशीं अस्तमानीं । पंचत्व पावला तत्क्षणी । शोक करिती जनक जननी । ऐका श्रोते एकचित्तें ॥७५॥

आक्रोशोनि भूमीसी । आफळी शिर सत्राणेसीं । पाषाण घेवोनि उरासी । घात करी ते नारी ॥७६॥

देह टाकी धरणीवरी । निर्जीव होवोनि क्षणभरी । आठवी दु:ख अपरांपरी । नयनीं वाहे पूर्ण जळ ॥७७॥

प्रेतपुत्रावरी लोळे । अलिंगोनि परिबळें । विष्टोनियां मायाजाळें । प्रलापीतसे ते नारी ॥७८॥

म्हणे ताता पुत्रराया । प्राणरक्षका माझ्या प्रिया । मातें केवी सोडूनियां । जासी कठोर मन करूनि ॥७९॥

कोठें गेलासी खेळावया । स्तनींचें क्षीर जातसे वायां । शीघ्र येई गा ठाकोनियां । पुत्रराया परियेसीं ॥८०॥

केवीं विसरूं तुझे गुण । माझा तूंचि निर्धान । तुझे गोजिरें बोलणें । केवीं विसरूं पुत्रराया ॥८१॥

तुझे रूपासारखा सुत । केवी देखों मी निश्चित । निधान देखत्यें स्वप्नांत । तैसें मज चाळ्विलें ॥८२॥

पुत्र व्यालें पांच आपण । त्यात तूं एक निधन । जधीं झालें गर्भधारण । तैपासाव संतोष ॥८३॥

डोहळे मज उत्तम होती । कधी नसे मी दुश्चिती । अत्योल्हास नवमासांतीं । पुत्र होईल म्हणोनि ॥८४॥

श्रीगुरूंनी दिधला मातें वर । पुत्र होईल निर्धार । त्याणें मज हर्ष फार । वरद पिंड म्हणोनि॥८५॥

जघीं तुज प्रसूत जाहल्यें । अनंत सौख्य मीं लाधलें । प्राणप्रिया तुज मीं पोसिलें । आमुतें रक्षिसी म्हणोनि ॥८६॥

मज भरंवसा तुझा बहुत । वृध्दाप्याचा पोषक म्हणत । आम्हांसी सांडूनि जातां उचित । धर्म नव्हे पुत्रराया ॥८७॥

दु:ख झालें मज बहुत ।विसरल्यें बाळा तुज देखत । तूं तारक आमुचा सत्य । म्हणोनि विश्वास केला जाण ॥८८॥

ऐंसें नानापरी देखा । दु:ख करी ते बाळिका । निवारण करिती सकळ लोक । वाया दु:ख तूं कां करिसी ॥८९॥

देवदानवऋषेश्वरांसी । होणार न चुके परियेसीं । ब्रह्मा लिही ललाटेंसी। तेचि अढळ जाण सत्य ॥९०॥

अवतार होताति हरिहर । तेही न राहती स्थिर । उम्ही तरी मनुष्य नर । काय अढळ तुम्हांसी॥९१॥

येणेंपरी सांगती जन । आणखी दु:ख आठवी मन । म्हणे मातें दिधलीं जाण । स्थिर म्हणोनि दोन्ही फळें ॥९२॥

श्रीगुरु-नरसिंहसरस्वती । भूमंडळीं महाख्याति । औदुंबरी सदा वसती । त्यांणी दिधले मज सुत ॥९३॥

त्याचे बोल केवी मिथ्या । मातें दिधला वर सत्या । त्यासी घडो माझी हत्या। पुत्रासवें देईन प्राण ॥९४॥

म्हणोनि आठवी श्रीगुरूसी । देवा मातें गांजिलेंसी । विश्वास केला मी तुम्हांसी । सत्य वाक्य तुझें म्हणत ॥९५॥

सत्यसंकल्प तूंचि होसी । म्हणोनि होत्यें विश्वासीं । घात केला गा आम्हांसी । विश्वासघातकी केवी न म्हणों ॥९६॥

त्रयमूर्तीचा अवतारु । तुंचि नरसिंहसरस्वती गुरू। ध्रुवा विभीषणा दिधला वरु । केवीं सत्य म्हणों आतां ॥९७॥

विश्वास केला तुझे बोलें । आतां मातें उपेक्षिलें । माझ्या मनीं निश्चय केला । प्राण देईन तुम्हांवरी ॥९८॥

लोक येती तुझ्या स्थानीं । सेवा करिती निवसोनि । औदुंबरी प्रदक्षिणा करूनि । पुरश्चरणें करिताति ॥९९॥

आपण केलें पुरश्चरण । फळा आलें मज साधन । आतां तुजवरी देईन प्राण । काय विश्वास तुझ्या स्थानीं ॥१००॥

कीर्ति होईल सृष्टींत । आम्हां केला तुवां घात । पुढें तुज भजती भक्त । काय भरंवसा तयांसी ॥१॥

ब्रह्मस्वदोषें पीडोन । दृढ धरिले तुझे चरण । अंगीकारोनि मध्यें त्यजणें । कवण धर्म घडतसे ॥२॥

व्याघ्रातें धेनु भिऊन । जाय आणिकापाशीं ठासून । तोचि मारी तिचा प्राण । तयापरी झालें आपणासी ॥३॥

कीं एखादा पूजेसी । जाय देउळा संधीसी । तेंचि देऊळ तयासी । मृत्यु जोऊनि वर पडे ॥४॥

तयपरी आपणासी । जाहलें स्वामी परियेसीं । माझ्या प्राणसुतासी । न राखिसी देवराया ॥५॥

येणेंपरी अहोरात्री । दु:ख करीतसे ते नारी । उदय जाहला दिनकरीं । प्रात:काळीं परियेसा ॥६॥

द्विज ज्ञाते मिळोनि सकळी । येती तये स्त्रियेजवळी । वायां दु:ख सर्वकाळी । करिसी मूर्खपणें तूं ॥७॥

जे जे समयीं होणार गति । ब्रह्मादिकां न चुके ख्याति । चला जाऊं गंगेप्रती । प्रेतसंस्कार करूं आतां ॥८॥

ऐसें वचन ऐकोनि । महा आक्रोश करी मनी । आपणासहित घाला वन्ही । अथवा नेदी प्रेतासी ॥९॥

आपणासहित बाळासी । करा पां अग्निप्रवेशी । येरवी नेदीं प्रेतासी । म्हणोनि उरीं बांधी बाळा ॥११०॥

लोक म्हणती तियेसी । नव्हसी तूं स्त्री, कर्कशी । प्रेतासवें प्राण देसी । कवण धर्म सांग आम्हां ॥११॥

नाहीं देखिलें न ऐकों कानीं । पुत्रासवें देती प्राण कोणी । वायां बोलसी मूर्खपणीं । आत्महत्या महादोष ॥१२॥

नानापरी तियेसी । बोधिती लोक परियेसीं । निश्चय तिनें केला ऐसी । प्राण त्यजीन पुत्रासवें ॥१३॥

दिवस गेला दोन प्रहर । प्रेतासी करूं नेदी संस्कार । अथवा न ये गंगतीरा । ग्रामीं आकांत वर्तला ॥१४॥

इतुकिया अवसरीं । आला एक ब्रह्मचारी । सांगे तिसी सविस्तारीं । आत्मज्ञान तये वेळीं ॥१५॥

सिध्द म्हणे नामधारका । पुढें अपूर्व झालें ऐका । ब्रह्मचारी आला एका । बोधिता झाला ज्ञान तिसी ॥१६॥

बाळ नव्हे तोचि गुरु । आला नरवेषधारु । नरसिंहसरस्वती अवतारु । भक्तवत्सल परियेसा ॥१७॥

म्हणोनि सरस्वतीगंगाधर सांगे गुरुचरित्राविस्तार । ऐकता होय मनोहर । शतायुषी पुरुष होय ॥१८॥

भक्तिपूर्वक ऐकती जरी । व्याधि नव्हती त्यांचे । पूर्णायुषी ते होती अमरी । सत्य माना माझा बोल ॥११९॥

इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिध्द-नामधारकसंवादे ब्रह्मसमंधपरिहार-प्रेतजननीशोकनं नाम विशोऽध्याय: ॥२०॥
ओवीसंख्या ११९
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

No comments:

Post a Comment