Tuesday, January 11, 2011

Gurucharitra - Adhyay 19

Chapter 19 Greatness of Audumbar is described in this chapter, the story of Shri Vishnu's Narasinhawatar & Hiranyakashyapu. After death of Hranykashyapu Narsinha's nails were filled with strong poison and so caused great heat in his body. Narsinha took Audumbar fruits and thrush nails in them. The poison and the heat of the body subsided. Narsinha was pleased. So he blessed the Audumbar tree, `You shall always bear fruits and people will worship you as the Kalpataru.

CHAPTER 19
Greatness of Audumbar: Ganganuj's Poverty wiped off.

Namdharak: "Leaving other holy trees why Shri Guru lived under the Audumber tree? Greatness of Ashwattha is described even in the Vedas, Why then he preferred Audumbar?"

Siddha : "Shri Vishnu took Narasinhawatar to kill the demon Hranyakashyapu. He tore the belly of the demon by his naisl, took out the intestines and put theem around his neck as a wreath. Narsinha's nails were filled wwith strong poision and so caused great heat in his body. Shri Lakshmi took Audumbar fruits and thrush Narsinha's nails in them. The poison and the heat of the body subsided and Lakshmi and Narsinha were pleased. So they blessed the Audumbar tree, `You shall always bear
fruits and people will worship you as the Kalpataru. Strong poisons will be subsided even by your sight and sterile women will get issues if they worship you with devotion.'

Audumbar is a Kalpa-Taru in Kaliyug, hence Shri Guru lived under it Brahma, Vishnu and Mahesh live here in the form of shri Dattatraya. When Shri Guru lived here, 64 yoginis used to come to him at midday and take Shri Guru to their place under the waters of the river, worshipped and offered him delicious food and Shri Guru would return to his place under the Audumbar.

Brahmins wondered how this sanyasi lived along under the Audumbar, as he did not go in the town to anybody for alms. Some bramins kept a watch but at midday they got frightened and so they gave up the idea.

Ganganuj was a farmer who had his field at the river side. At midday he saw that 64 yoginis came out of the river, bowwed to Shri Guru and took him to the river. A passage was created for him by the bifercation of the river water. After some time Shri Guru returned by the same passage.
Next day Ganganuj also followed Shri Guru when he was being taken by the yoginis. He saw that there was a nice place with buildings of precious stones, and there was a high and well decorated throne. Shri Guru was seated on the throne. He was duly worshipped, had Arati and was Shri Guru saw Ganganuj. Shri Guru asked him. `How did you come here?' He replied, `I came here to see Thy holy self.' Saying so, he bowed to Shri Guru, who said to him, `Your miseries are wiped off. Your desires will be
fulfilled. Do not disclose to anyone whatever you have seen here. Else you will lose all instantly.'

Then Shri Guru came to the Audumbar with him. Ganganuj came to his fields and found a treasure. He got knowledge also. He served Shri Guru with his wife and children with more devotion thereafter.
Om Magh Poornima Ganganuj said to Shri Guru `It is said that bath at Kashi and Prayag is very virtuous. How can this be possible for me? Shri Guru said, `Panch Ganga Sangam is like Prayag, Jugul is Kashi and Kolhapur is like Gaya. If you wish to see Kashi-Prayag I shall show it to you.'
Shri Guru was sitting on a tiger skin. He asked Ganganuj to shut his eyes and to hold the hind part of the skin firmly and they instantly reached Prayag in the morning. After having bath they went to Kashi at mid-day. They had darshan of Kashivishweshwar and went to Gaya in the afternoon. They returned to Audumbar by the same evening.

Shri Guru now thought of leaving the place. 64 Yoginis requested him, Why are you leaving us? All our miseries are wiped off when we see you.' Shri Guru smiled and said, `I am always at this Audumbar. You live here happily. Amarpur is also my dwelling place. Those who worship you, this Audumbar and the Padukas here, all their desires will be fulfilled, and they will get four purusharthas. One who takes bath at Papvinashi, Kanya and Siddha Tirthas, worships the Audumbar and these Padukas for seven days, even if his wife is 60 years old and sterile. If one recites a mantra,
under this Audumbar with a pure mind, it will be a great virtue. One lakh
rounds of this tree will wipe off leprosy and one's body would be bright as gold. Such is the significance of this place.'

Saying this, Shri Guru came to Gangapur on the bank of Bhima.

Contd....

श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥
नामधारक शिष्यराणा । लागे सिध्दाचिया चरणां । करसंपुट जोडून । विनवीतसे तया वेळी ॥१॥
जय जया सिध्द योगीश्वरा । तूंचि ज्योति अंधकारा । भक्तजनांच्या मनोहरा । भवसागरतारका ॥२॥
अज्ञानतिमिररजनींत । निजलों होतों मदोन्मत्त । गुरुचरित्र मज अमृत । प्राशन करविलें दातारा ॥३॥
त्याणें झालें मज चेत । ज्ञानसूर्यप्रकाश होत । तुझे कृपेने जागृत । जाहलों स्वामी सिध्दमुनि ॥४॥
पुढील कथाविस्तारा । निरोपावा योगीश्वरा । कृपा करी गा दातारा । म्हणोनि लागला चरणांसी ॥५॥
ऐकोनि शिष्याचें वचन । संतोषला सिध्द आपण । सांगतसे विस्तारुन । श्रीगुरुमहिमा अनुपम्य ॥६॥
शिष्योत्तमा नामंकिता । सांगेन ऐके गुरुची कथा । औदुंबरतळी अतिप्रीता । होते श्रीगुरु परियेसा ॥७॥
ऐकोनी सिध्दाचें वचन । नामधारक करी प्रश्न । अनेक पुण्यवृक्ष त्यजून । काय प्रीति औदुंवरी ॥८॥
अश्वत्थ्वृक्ष असे थोर । म्हणोनि सांगती वेद शास्त्र । श्रीगुरुप्रीति औदुंबर । कवण कारण निरोपावें ॥९॥
सिध्द म्हणे नामंकिता । सांगेन याचिया वृतांता । जधीं नरसिंह अवतार होता । हिरण्यकश्यप विदारिला ॥१०॥
नखेंकरूनि दैत्यासी । विदारिलें कोपेसीं । आंतडीं काढूनियां हषीं । घालती माळ गळां नरहरीनें ॥११॥
त्या दैत्याचे पोटी विष होतें काळ्कूटी । जैसी वडवाग्नि मोठी तैसें विष परियेसा ॥१२॥
विदारण करितां दैत्यासी । वेधलें विष त्या नखांसी । तापली नखें बहुवसी । ऐक शिष्या एकचित्तें ॥१३॥
तये समयी महालक्ष्मी । घेऊनि आली अतिप्रेमी । औदुंबरफळ नामी । शांतीकारणें नखांसी ॥१४॥
तये वेळी शीतलार्थ । नखें रोविलीं औदुंबरात । विषाग्नि झाला शांत । उग्र नरसिंह शांत झाला ॥१५॥
शांत जाहला नृसिंहदेव । देता झाला लक्ष्मीसि खेंव । संतोषोनि उभय देव । वर देती तये वेळीं ॥१६॥
तया समयिं औदुंबरासी देती वर हृषीकेशी । " सदा फळित तूं होसी । 'कल्पवृक्ष ' तुझे नाम ॥१७॥
जे जन भजती भक्तीसीं । काम्यं होय त्वरितसीं । तुज देखतांचि परियेसीं । उग्र विष शांत होय ॥१८॥
जे सेवितील मनुष्यलोक । अखिलकाम्य पावोनि एक । फळ प्राप्त होय निके । पापावेगळा होय नर ॥१९॥
वांझ नारी सेवा करितां । पुत्र होतील तिसी त्वरिता । जे नर असतील दैन्यपीडिता । सेवितं होतील श्रियायुक्त ॥२०॥
तुझी छायीं बैसोन । जे जन करिती जपानुष्ठान । अनंत फळ होय ज्ञान । कल्पिलें फळ होय त्यांसी ॥२१॥
तुझे छायीं जळांत । स्नान करितां पुण्य बहुत । भागीरथीस्नान करीत । तितुकें पुण्य परियेसा ॥२२॥
तुज सेविती त्या नरासी । व्याधि नव्हती कवणे दिवसीं । ब्रह्महत्यादि महादोषी । परिहार होती परियेसा ॥२३॥
जें जें कल्पूनि मानसी । तुज सेविती भावेसीं । कल्पना पुरती भरंवसी । कलियुगी कल्पवृक्ष तूंचि ॥२४॥
सदा वसों तुजपाशीं । लक्ष्मीसहित शांतीसी " । म्हणोनि वर देती हर्षी । नरसिंहमूर्ति तये वेळी ॥२५॥
ऐसा वृक्ष औदुंबर । कलियुगीं तोचि कल्पतरु । नरसिंहमूर्ति होतां उग्र । शांत झाली तयापाशी ॥२६॥
याकारणे श्रीगुरुमूर्ति नृसिंहमंत्र उपासना करिती । उग्रत्वाची करावया शांति । औदुंबरी वास असे ॥२७॥
अवतार आपण तयाचे स्थान आपुलें असे साचें । शांतवन करावया उग्रत्वाचे । म्हणोनि वास औदुंबरी ॥२८॥
सहज वृक्ष तो औदुंवर । कल्पवृक्षसमान तरु । विशेषें वास केला श्रीगुरु । कल्पिली फळे तेथे होती ॥२९॥
तया कल्पद्रुमातळी । होते श्रीगुरुस्तोममौळी । ब्रह्मा-विष्णु-नेत्रभाळी । देह मानुषी धरोनियां ॥३०॥
भक्तजनां तारणार्थ । पावन करिती समस्त तीर्थ । अवतार त्रयमूर्ति गुरुनाथ । भूमीवरी वर्तत असे ॥३१॥
वृक्षातळी अहर्निशीं । श्रीगुरु असती गौप्येसी । माध्यान्हकळसमयासी । समारंभ होय तेथें ॥३२॥
अमरेश्वर्संनिधानीं । वसई चौसष्ट योगिनी । पूजा करावया माध्यान्ही । श्रीगुरुजवळी येती नित्य ॥३३॥
नमन करूनि श्रीगुरूसी । नेती आपुले मंदिरासी । पूजा करिती विधीसीं । गंधपरिमळ-कुसुमें ॥३४॥
आरोगोनि तयां घरी । पुनरपि येती औदुंबरी । एके समयी द्विजवरी । विस्मय करिती देखोनियां ॥३५॥
म्हणती अभिन याति कैसा । न क्री भिक्षा ग्रामांत ऐसा । असतो सदा अरण्यवासा । कवणेपरी काळ कंठी ॥३६॥
पाहूं याचें वर्तमान । कैसा क्रमितो दिनमान । एखादा नर ठेवून । पाहो अंत यतीश्वराचा ॥३७॥
ऐसं विचारूनि मानसी । गेले संगमस्थानासी । माध्यान्हसमयी तयांसी । भय उअपजलें अंत:करणीं ॥३८॥
पाहूं म्हणती श्रीगुरूचा अंत । तेचि जाती यमपंथ । ऐसे विप्र मदोन्मत्त । अधोगतीचे तेचि इष्ट ॥३९॥
उपजतां भय ब्राह्मणांसी । गेले आपुलें स्थानासी । गंगनुज थडियेसी । होता वृत्ति राखीत ॥४०॥
त्याणें देखिले श्रीगुरुसी । आल्या योगिनी पूजेसी । गंगेमध्ये येतां कैसी । मार्ग जाहला जळांत ॥४१॥
विस्मय करी तो नरु । म्हणे कैसा यतीश्वरु । द्विभाग झाला गंगापूरु । केवी गेले गंगेंत ॥४२॥
श्रीगुरुतें नेऊनि। पूजा केली त्या योगिनी। भिक्षा तेथें करूनि आले मागुती बाहेर ॥४३॥
पहात होता गंगानुज । म्हणे कैसे जाहले चोज । अवतार होईल ईश्वरकाज । म्हणोनि पूजिती देवकन्या ॥॥४४॥
येरे दिवसीं मागुती । हाती घेऊन आरति । देवकन्या ओंवाळिती । श्रीगुरूतें नमूनियां ॥४५॥
पुन्हा गंगाप्रवाहांत । श्रीगुरु निघाले योगिनीसहित । हो कां नर होता पहात । तोही गेला सर्वेचि ॥४६॥
नदीतीरी जातां श्रीगुरु । द्विभार जाहलें गंगेत द्वारु । भीतरी दिसे अनुपम्य पुर । रत्नखचित गोपुरेसीं ॥४७॥
अमरावतीसमान नगर जैसी तेजें दिनकर । श्रीगुरु जातांचि समस्त पुर। घेऊनि आलें आरति ॥४८॥
ओवाळून आरति । नेलें आपुले मंदिराप्रति सिंहासन रत्नखचिती । बैसो घालिती तया समयीं ॥४९॥
पूजा करिती विधीसीं । जे कां उपचार षोडशी । अनेकापरी षड्रसेसीं । आरोगिलें तये वेळीं ॥५०॥
श्रीगुरु दिसती तया स्थानीं । त्रैमूर्ति जैसा शुलपाणि । पूजा घेऊनि तत्क्षणीं । मग परतले तयेवेळी ॥५१॥
देखोनियां तया नरासी । म्हणती तूं कां आलासी । विनवी तो नर स्वमियासी । सहज आलों दर्शनाते ॥५२॥
म्हणोनि लागला गुरुचरणीं । तल्लीन होवोनि अंत:करणीं । म्हणे स्वामी गिरिजारमणा । होसी त्रयमूर्ति तुंचि एक ॥५३॥
न कळे तुझें स्वरूपज्ञान । संसारमाया वेष्टून । तूं तारक या भवाणी । उध्दरावे स्वामिया ॥५४॥
तूं तारक विश्वासी । म्हणोनि भूमी अवतरलासी । अज्ञान म्हणिजे रजनीसी । ज्योति:स्वरूप तूंचि एक ॥५५॥
तुझें दर्शन होय ज्यासी । सर्वाभीष्ट फळ होय त्यासी । इहपर अप्रयासी । जोडे नरा न लागतां क्षण ॥५६॥
ऐशापरी तो देखा । स्तुति करितो नर ऐका । संतोषूनि गुरुनायकें । आश्वासिले तया वेळी ॥५७॥
श्रीगुरु म्हणती तयासी । तुझें दैन्य गेलें परियेसी । जें जें तूं इच्छिसी मानसी । सकळाभीष्ट पावशील ॥५८॥
येथील वर्तमान ऐसी । न सांगावे कवणासी । जया दिवशी प्रगट करिसी । तूतें हानी होईल जाण ॥५९॥
येणेंपरी तयासी । श्रीगुरु सांगती परियेसी ।लाले औदुंबरापाशी । गंगानुज-समागमें ॥६०॥
श्रीगुरूचा निरोप घेऊन । गेला गंगानुज आपण । वृत्तिस्थानीं जातांचि क्षण । निधान त्यासी लाधलें ॥६१॥
ज्ञानवं तो झाला नरु । नित्य सेवा करी तो गुरु । पुत्रपौत्र श्रियाकर । महानंदे वर्ततसे ॥६२॥
भक्तिभावें श्रीगुरुसी । नमन करी प्रतिदिवसीं । सेवा करी कलत्रेंसी । एकोभावेंकरूनियां ॥६३॥
वर्तता ऐसे एके दिवसी । आली पौर्णिमा माघमासीं । नमन करूनि श्रीगुरूसी । विनवीतसे तो भक्त ॥६४॥
म्हणे स्वामी जगद्गुरु । माघस्नानी प्रयाग थोरु । म्हणोनि सांगती द्विजवरु । काशीपूर महाक्षेत्र ॥६५॥
कैसे प्रयाग गयास्थान । कैसें वाराणसी भुवन । नेणों आपण यातिहीन । कृपा करणें स्वामिया ॥६६॥
श्रीगुरु म्हणती तयासी । पंचगंगासंगमेंसी । ' प्रयाग ' जाणावें भरंवसी । ' काशीपुर " तें जुगुळ ॥६७॥
दक्षिण ' गया' कोल्हापुर । त्रिस्थळी ऐसें मनोहर । जरी पहासी प्रत्यक्षाकार । दावीन तुज चाल आतां ॥६८॥
बैसले होते व्याघ्राजिनीं । धरी गा मागे दृढ करूनि । मनोवेगें तत्क्षणी । गेले प्रयागा प्रात:काळी ॥६९॥
तेथे स्नान करूनि । गेले काशीस माध्याह्निं । विश्वनाथा दाखवूनि सर्वेचि गेले गयेसी ॥७०॥
ऐसी त्रिस्थळी आचरोनि । आले परतोनि अस्तमानीं । येणेपरी । तयास्थानीं । देखता झाला तो नर ॥७१॥
विश्वनाटक श्रीगुरुमूर्ति । प्रकट झाली ऐसी किर्ति । श्रीगुरु मनीं विचारिती । आतां येथे गौप्य व्हावे ॥७२॥
ऐसेपरी तयास्थानीं । प्रकट झाले श्रीगुरुमुनि अमरेश्वरातें पुसोनि । निघत झाले तये वेळी ॥७३॥
श्रीगुरु निघतां तेथोनि । आल्या चौसष्ट योगिनी । निनविताति करूणावचनीं । आम्हां सोडूनि केवीं जातां ॥७४॥
नित्य तुमचे दर्शनासी । तापत्रय हरती दोषी । अन्नपूर्णा तुम्हांपाशी । केवी राहुं स्वामिया ॥७५॥
येणेंपरी श्रीगुरुसी । योगिनी विनविती भक्तीसीं । भक्तवत्सलें संतोषीं । दिधला वर वेळीं ॥७६॥
श्रीगुरु म्हणती तयांसी। सदा असों औदुंबरेसी । प्रकटार्थ जाणे पूर्वेसी । स्थान आमुचें येथेचि असे ॥७७॥
तुम्ही रहावें येथें औदुंबरी । कल्पवृक्ष मनोहरी । अन्नपूर्णा प्रीतिकरीं । औदुंबरी ठेवितों ॥७८॥
कल्पवृक्ष औदुंबर । येथे असा तुम्ही स्थिर । अमरापुर पश्चिम तीर । अमर स्थान हेंचि जाणा ॥७९॥
प्रख्यात होईल स्थान बहुत । समस्त नर पूजा करीत । मनकामना होय त्वरित । तुम्हीं त्यांसी साह्य व्हावे ॥८०॥
तुम्हांसहित औदुंबरी । आमुच्या पादुका मनोहरी । पूजा करिती जे तत्परी मनकामना पुरती जाणा ॥८१॥
येथे असे अन्नपूर्णा ।नित्य करिती आराधना । तेणें होय कामना । अतुर्विध पुरुषार्थ ॥८२॥
पापविनाशी काम्यतीर्थ । सिध्द्तीर्था स्नान करीत । सात वेळ स्नपन करीत तुम्हांसहित औदुंबरी ॥८३॥
साठी वर्षे वांझेसी । पुत्र होती शतायुषी । ब्रह्महत्या पाप नाशी । स्नानमात्रे त्या तीर्था ॥८४॥
सोमसूर्यग्रहणेसी । अथवा मास संक्रांतीसी । स्नान करिती फळें कैसी । ऐका श्रोते एकचित्तें ॥८६॥
श्रुंग-खूर-सुवर्णेसी । अलंकृत धेनूसी । सहस्त्र कपिला ब्राह्मणांसी । सुरनदीतीरी ऐका । भोजन दिल्हें फळ असे ॥८८॥
औदुंबरवृक्षातळीं । जप करिती जे मननिर्मळी । कोटिगुणें होती फळें । होम केलिया तैसेंचि ॥८९॥
रुद्र जपोनि एकादशी । पूजा करिती मनोमानसी । अतिरुद्र केले फळसदृशी । एकाचित्तें परियेसा ॥९०॥
मंदगती प्रदक्षिणा । करितां होय अनंत पुण्य । पदोपदीं वाजपेययज्ञ । फळ तेथें परियेसा ॥९१॥
नमन करितां येणेंपरीं। पुण्य असे अपरांपरी । प्रदक्षिणा दोन चारी । करूनी करणें नमस्कार ॥९२॥
कुष्ठ असेल अंगहीन । त्याणें करणें प्रदक्षिणा । लक्ष वेळ करितां जाणा । देवासमान देह होय ॥९३॥
ऐसे स्थान मनोहरु । सहज असे कल्पतरु । म्हणोनि सांगतति गुरु । चौसष्ठ योगिनींसी ॥९४॥
ऐसा निरोप देऊन । श्रीगुरु निघाले तेथून । जेथें होतें गाणगाभुवन । भीमातीरी अनुपम्य ॥९५॥
विश्वरूप जगन्नाथ । अखिल ठायीं असे वसत । औदुंबरी प्रीति बहुत । नित्य तेथें वसतसे ॥९६॥
गौप्य राहोनी औदुंबरी । प्रकटरूपें गाणगापुरी । राहिले गुरु प्रीतिकरीं । प्रख्यात झाले परियेसा ॥९७॥
सिध्द म्हणे नामधारकासी । श्रीगुरुमहिमा आहे ऐसी । प्रकट झाले बहुवसी । गाणगापुरी परियेसा ॥९८॥
म्हणोनि सरस्वतीगंगाधर । सांगे गुरुचरित्रविस्तार । भक्तिपूर्वक ऐकती नर । लाभे चतुर्विध पुरुषार्थ ॥९९॥
गुरुचरित्र कामधेनु । जे ऐकती भक्तजनु । त्यांचे घरी निधानु । सकळाभीष्टें पावती ॥१००॥
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिध्द-नामधारकसंवादे औदुबरवृक्षमहिमानं - योगिनीप्रतिदिनदर्शनं तथा वरप्रदानं नाम एकोनविशोऽध्याय: ॥१९॥
ओवी संख्या १००
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु ॥

No comments:

Post a Comment