Thursday, January 6, 2011

Gurucharitra - Adhyay 13

Chapter 13 shri Narsinha Sarswati comes back to Karanja (*Sha.1338 (1416 CE))and cures one Brahmin.at Vasar (Name of Village) and meet to Sayamdeo

CHAPTER 13
Brahmin's Colic Pain Subsided.

Namdharak :- "Gurudeo, Shri Guru initiated Sanyas to Madhav at Prayag। Please let me know what occurred later". Siddha - "Shri Guru lived at Prayag for some days. He had may disciples there. These included Bal Saraswati, Krishna, Saraswati, Upendra Saraswati, Madav Saraswati, Sadanand Saraswati, Dnyanjyoti Saraswati and myself as seven chief disciples. He then visited holy places in the south and came to Karanjahim, he was invited door to door. The mother recollected that he was Shripad Shrivallabha and called herself fortunate.

She told this to her husband when both requested him to liberate them from the worldly-sea. Shri Guru said, `If a person accepts sanyas his fortytwo generations (21 Parental & 21 maternal) are liberated. Their issues have no fear of the God of death. You will see that you sons live for hundred years. Then you will go to Kashi, the holy place of liberation. There is no doubt about this.

Ratnai, his sister requested Shri Guru, `I am entangled in a family trap. Please take me out of this. I wash to do penance.' Shri Guru - `Serve your husband and this will liberate you. One has to suffer as per one's fate. Females can win over this worldly sea only with the help of their husbands. Thinking the husband to be Shri Shiva, serve him. This is what the Vedas, Shastras and Puranas dictate.'

She further asked, `you know the past and the furture also. Please tell me what is my future.' Shri guru - `In the previous birth, you hit a cow with you legs, you made
the neighbouring couples quarrel amongst themselves, so you will develop leprosy for hitting the cow and your husband will leave you and be a Sanyasi.'

Hearing Guru - `You shall live amicably for some years. In old age your husband will accept Sanyas. When you have leprosy, you will see me. You come to Papvinashi on the bank of the Bhima river in the South. Nearby is the Bhima Amarja Sangam and Ganangapur. After bathing in the Papavinashi, you will be cured of leprosy.'

Shri Guru then went to Trimbakeshwar, the place of penance of Goutam Muni. Shri Shankar was pleased by the penance of Goutam who brought Ganga (Godavary) on the earth for the benefit of the people. Shri Guru travelled by the Bank of Godavery and came to Manjrika. A learned Brahmin `Madhavaranya' lived here. He adored `Narsinha'. Seeing that Shri Guru appeared just a `Narsinha', he bowed to him and praised him
in Sanskrit. Shri Guru was pleased and he appeared before him in his divine form. Madhavaranya prostrated before him and chanted prayers.
Shri Guru then blessed him.

Shri Guru then went to Brahmeshwar. Here a Brahmin suffered from acute colic pain. He was rolling in the sand of the river due to severe pain. He had to be on fast for several days. Whenever he dined he had severe pain. He was intending to give up his life by drowning himself in the river and thus getting rid of the acute colic pain. Knowing his intentions, shri Guru asked his disciples to bring the Brahmin to him.
When he was brought before himn, Shri Guru asked him, `Why are you committing suiside? This is a great sin. What is your misery?.'

Brahmin - `I am burdensome on this earth. I dine once in a fortnight or a month, but I have to bear a very severe colic pain. The body lives on food and if food cannot be taken how can this body survive?'
Shri Guru -`I shall give a medicine. You have a full meal today.' The Brahmin was much encouraged with Shri Guru's words. In the meanwhile the officer of the town came to the river for bath. Seeing Shri Guru, he bowed to him with reverence. Shri Guru inquired `May I know your name and where - abouts?'

The officer said, `I belong to Koundinya Gotra and am a Brahmin of Apastamb shakha. My name is Sayamdeo. I come from Kanchi. I am serving here as a Town - officer of a Muslim Ruler for one year. I feel myself very fortunate to see thy holyself today. Sins are wiped off by seeing the Ganga, heat of the body subsides by seeing the moon and poverty is destroyed by the favour of a Kalpa-Taru. But by seeing thyself
along, all these three miseries are wiped off and one gets all the four valours viz.

Sayamdeo humbly expressed, `Gurudeo, he dined yesterday after one month and subsequently he had severe colic pain. If he is given food today and if he dies, shall I not be held responsible for his death?'

Shri Guru - `I am giving medicine which should be fried in ghee and given to him. Besides give him food containing sugar and milk. Do not have any doubt in the mind.'

Sayamdeo agreed and further requested Shri Guru to grace his home by his presence and accept alms at his house. Shri Guru gladly accepted his invitation.
Shri Guru, three Brahmins and other disciples came to Sayamdeo. Sayamdeo's wife Jakhai was a devoted wife. Both worshipped Shri Guru ceremoniously. They worshipped the disciples also. All had a happy dinner that day. The colic pain of the Brahmin disappeared instantly by the grace of Shri Guru. All were wonderstruck to see this miracle. Shri Guru blessed Sayamdeo saying, your family will flourish and devotion of
Guru will be continued in the later generations of your family.

Contd....

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥
नामधारक शिष्यराणा । लागे सिद्धाचिया चरणां । करसंपुट जोडूनि जाणा । विनवीतसे परियेसा ॥१॥
जय जया सिद्ध मुनी । तूं तारक या भवार्णी । सांगितलें ज्ञान प्रकाशोनि । स्थिर जाहलें मन माझें ॥२॥
गुरुचरित्रकथामृत । सेवितां तृष्णा अधिक होत । शमन करणार समर्थ । तूंचि एक कृपानिधि ॥३॥
गुरुचरित्र कामधेनु । सांगितलें तुम्हीं विस्तारोनु । तृप्त नव्हे माझें मनु । आणखी अपेक्षा होतसे ॥४॥
क्षुधेंकरुनि पीडिलें ढोर । जैसें पावे तृणबिढार । त्यातें होय मनोहर । नवचे तेथोनि परतोनि ॥५॥
एखादा न देखे तक्र स्वप्नीं त्यासी मिळे क्षीरबरणी । नोहे मन त्याचे धणी । केवीं सोडी तो ठाव ॥६॥
तैसा आपण स्वल्पज्ञानी नेणत होतों गुरु-निर्वाणी । अविद्यामाया वेष्‍टोनि । कष्‍टत होतों स्वामिया ॥७॥
अज्ञानतिमिररजनीसी । ज्योतिस्वरुप तूंचि होसी । प्रकाश केलें गा आम्हांसी । निजस्वरुप श्रीगुरुचें ॥८॥
तुवां केले उपकारासी । उत्तीर्ण काय होऊं सरसी । कल्पवृक्ष दिल्हेयासी । प्रत्युपकार काय द्यावा ॥९॥
एखादा देतां चिंतामणी । त्यासी उपकार काय धरणीं । नाहीं दिधलें न ऐकों कानीं । कृपामूर्ति सिद्धराया ॥१०॥
ऐशा तुझिया उपकारासी । उत्तीर्ण नोहे जन्मोजन्मेसीं । म्हणोनि लागतसे चरणांसी । एकोभावेंकरोनियां ॥११॥
स्वामींनीं निरोपिला धर्म-अर्थ । अधिक झाला मज स्वार्थ । उपजला मनीं परमार्थ । गुरुसी भजावें निरंतर ॥१२॥
प्रयागीं असतां गुरुमूर्ति । माधवसरस्वतीस दीक्षा देती । पुढें काय वर्तली स्थिति । आम्हांप्रती विस्तारावें ॥१३॥
ऐकोनि शिष्याचें वचन । सिद्धमुनि संतोषोन । मस्तकीं हस्त ठेवून । आश्वासिती तया वेळीं ॥१४॥
धन्य धन्य शिष्या सगुण । तुज लाधले श्रीगुरुचरण । संसार तारक भवार्ण । तूंचि एक परियेसा ॥१५॥
तुवां ओळखिली श्रीगुरुची सोय । म्हणोनि पुससी भक्तिभावें । संतोष होतो आनंदमय । तुझ्या प्रश्नेंकरुनियां ॥१६॥
सांगेन ऐक एकचित्तें । चरित्र गुरुचें विख्यातें । उपदेश देऊनि माधवातें । होते क्वचित्काळ तेथेंचि ॥१७॥
असतां तेथें वर्तमानीं । प्रख्यात झाली महिमा सगुणी । शिष्य झाले अपार मुनि । मुख्य माधवसरस्वती ॥१८॥
तया शिष्यांचीं नामें सांगतां । विस्तार होईल बहु कथा । प्रख्यात असती नामें सात । सांगेन ऐक एकचित्तें ॥१९॥
बाळसरस्वती कृष्णसरस्वती । उपेंद्र-माधवसरस्वती । पांचवा असे आणीक यति । सदानंदसरस्वती देखा ॥२०॥
ज्ञानज्योतिसरस्वती एक । सातवा सिद्ध आपण ऐक । अपार होते शिष्य आणिक । एकाहूनि एक श्रेष्‍ठ पैं ॥२१॥
त्या शिष्यांसमवेत । श्रीगुरु निघाले दक्षिणपंथ । समस्त क्षेत्रें पावन करित । आले पुन्हा कारंजनगरासी ॥२२॥
भेटी झाली जनकजननी । येवोनि लागताति चरणीं । चतुर्वर्ग भ्राते भगिनी । समस्त भेटती स्वामिया ॥२३॥
देखानियां श्रीगुरुमूर्तीसी नगरलोक अत्यंत हर्षी । आले समस्त भेटीसी । पूजा करिती परोपरी ॥२४॥
घरोघरीं श्रीगुरुसी । पाचारिती भिक्षेसी । जाहले रुपें बहुवसी । घरोघरीं पूजा घेती ॥२५॥
समस्त लोक विस्मय करिती । अवतार हा श्रीविष्णु निश्चितीं । वेषधारी दिसतो यति । परमपुरुष होय जाणा ॥२६॥
यातें नर जे म्हणती । ते नर जाती नरकाप्रती । कार्याकारण अवतार होती । ब्रह्माविष्णुमहेश्वर ॥२७॥
जननीजनक येणें रीतीं । पूजा करिती भावभक्तीं । श्रीगुरू झाले श्रीपादयति । जातिस्मृति जननीसी ॥२८॥
देखोनि जननी तये वेळीं । माथा ठेवी चरणकमळीं । सत्यसंकल्प चंद्रमौळी । प्रदोषपूजा आली फळा ॥२९॥
पतीस सांगे तया वेळीं । पूर्वजन्माचें चरित्र सकळीं । विश्ववंद्य पुत्र प्रबळी । व्हावा म्हणोनि आराधिलें म्यां ॥३०॥
याचि श्रीपाद-ईश्वराचें । पूजन केलें मनोवाचें । प्रसिद्ध झालें जन्म आमुचें । साफल्य केलें परियेसा ॥३१॥
म्हणोनि नमिती दोघेजणीं । विनविताति कर जोडूनि । उद्धरावें या भवार्णी । जगन्नाथा यतिराया ॥३२॥
श्रीगुरू म्हणती तयांसी । एकादे काळीं परियेसीं । पुत्र होय संन्यासी । उद्धरील कुळें बेचाळीस ॥३३॥
त्यासी शाश्वत ब्रह्मलोक । अचळ पद असे देख । त्याचे कुळीं उपजतां आणिक । त्यासीही ब्रह्मपद परियेसा ॥३४॥
यमाचे दुःखें भयाभीत । नोहे त्याचे पितृसंततींत । पूर्वज जरी नरकीं असत । त्यांसी शाश्वत ब्रह्मपद ॥३५॥
याकारणें आम्हीं देखा । घेतला आश्रम विशेखा । तुम्हां नाहीं यमाची शंका । ब्रह्मपद असे सत्य ॥३६॥
ऐसें सांगोनि तयांसी । आश्वासीतसे बहुवसी । तुमचे पुत्र शतायुषी । अष्‍टैश्चर्ये नांदती ॥३७॥
त्यांचे पुत्रपौत्र तुम्ही । पहाल सुखें तुमचे नयनीं । पावाल क्षेम काशीभुवनीं । अंतकाळीं परियेसा ॥३८॥
मुक्तिस्थान काशीपुर । प्रख्यात असे वेदशास्‍त्र । न करा मनीं चिंता मात्र । म्हणोनि सांगती तये वेळीं ॥३९॥
त्यांची कन्या असे एक । नाम तिचें 'र‍त्‍नाई' विशेष । श्रीगुरुसी नमूनि ऐक । विनवीतसे परियेसा ॥४०॥
विनवीतसे परोपरी । स्वामी मातें तारीं तारीं । बुडोनि जात्यें भवसागरीं । संसारमाया वेष्‍टोनियां ॥४१॥
संसार-तापत्रयासी । आपण भीतसें परियेसीं । निर्लिप्‍त करीं गा आम्हांसी । आपण तपासी जाईन ॥४२॥
ऐकोनि तियेचें वचन । श्रीगुरु निरोपिताति आपण । स्त्रियांसी पतिसेवाचरण । तेंचि तप परियेसा ॥४३॥
येणें या भावार्णवासी । कडे पडती परियेसीं । जैसा भाव असे ज्यासी । तैसें होईल परियेसा ॥४४॥
उतरावया पैल पार । स्‍त्रियांसी असे तो भ्रतार । मनें करोनि निर्धार । भजा पुरुष शिवसमानी ॥४५॥
त्यासी होय उद्धार गति । वेदपुराणें वाखाणिती । अंतःकरणीं न करीं खंती । तूतें गति होईल जाण ॥४६॥
ऐकोनि श्रीगुरुचें वचन । विनवीतसे कर जोडून । श्रीगुरुमूर्ति ब्रह्मज्ञान । विनवीतसें अवधारीं ॥४७॥
तूं जाणसी भविष्यभूत । कैसें मातें उपदेशीत । माझें प्रालब्ध कवणगत । विस्तारावें मजप्रति ॥४८॥
श्रीगुरु म्हणती तियेसी । तुझी वासना असे तपासी । संचित पाप असे तुजसी । भोगणें असे परियेसा ॥४९॥
पूर्वजन्मीं तूं परियेसीं । चरणीं लाथिलें धेनूसी । शेजारी स्‍त्रीपुरुषांसी । विरोधें लाविला कलह जाणा ॥५०॥
तया दोषास्तव देखा । तूतें बाधा असे अनेका । गायत्रीसी लाथिलें ऐका । तूं सर्वांगीं कुष्‍ठी होसील ॥५१॥
विरोध केला स्त्रीपुरुषांसीं । तुझा पुरुष होईल तापसी । तुतें त्यजील भरंवसीं । अर्जित तुझें ऐसें असे ॥५२॥
ऐकोनि दुःख करी बहुत । श्रीगुरुचरणीं असे लोळत । मज उद्धारावें गुरुनाथा त्वरित । म्हणोनि चरणीं लागली ॥५३॥
श्रीगुरू म्हणती ऐक बाळे । क्वचित्काळ असाल भले । अपरवयसा होतांचि काळें । पति तुझा यति होये ॥५४॥
तदनंतर तुझा देह । कुष्‍ठी होईल अवेव । भोगूनि स्वदेहीं वय । मग होईल तुज गति ॥५५॥
नासतां तुझा देह जाण । भेटी होईल आमुचे चरण । तुझें पाप होईल दहन । सांगेन क्षेत्र ऐक पां ॥५६॥
भीमातीर दक्षिण देशीं । असे तीर्थ पापविनाशी । तेथें जाय तूं भरंवसीं । अवस्था तुज घडलियावरी ॥५७॥
या भूमंडळीं विख्यात । तीर्थ असे अति समर्थ । गंधर्वपुर असे ख्यात । अमरजासंगम प्रसिद्ध जाण ॥५८॥
ऐसें सांगोनि तियेसी । श्रीगुरू निघाले दक्षिण देशीं । त्र्यंबक-क्षेत्रासी । आले, गौतमी-उद्धव जेथें ॥५९॥
शिष्यांसहित गुरुमूर्ति । आले नाशिकक्षेत्राप्रती । तीर्थमहिमा असे ख्याति । पुरणांतरीं परियेसा ॥६०॥
तीर्थमहिमा सांगतां । विस्तार होईल बहु कथा । संक्षेपमार्गे तुज आतां । सांगतसें परियेसीं ॥६१॥
त्या गौतमीची महिमा । सांगतां अपार असे आम्हां । बहिरार्णव-उदक उगमा । ब्रह्मांडाव्यतिरिक्त ॥६२॥
जटामुकुटीं तीर्थेश्वर । धरिली होती प्रीतिकर । मिळोनि समस्त ऋषीश्वर । उपाय केला परियेसा ॥६३॥
ब्रह्मऋषि गौतम देखा । तपस्वी असे विशेषा । व्रीहि पेरिले वृत्तीं ऐका । अनुष्‍ठानस्थानाजवळी ॥६४॥
पूर्वी मुनी सकळी । नित्य पेरुनि पिकविती साळी । ऐसे त्यांचे मंत्र बळी । महापुण्यपुरुष असती ॥६५॥
समस्त ऋषि मिळोनि । विचार करिती आपुले मनीं । ऋषिगौतम महामुनी । सर्वेश्वराचा मुख्य दास ॥६६॥
त्यासी घालितां सांकडें । गंगा आणील आपुलें चाडें । समस्तां आम्हां पुण्य घडे । गंगास्नानें भूमंडळीं ॥६७॥
श्र्लोक ॥ या गतिर्योगयुक्तानां मुनीनामूर्ध्वरेतसाम्‌ । सा गतिः सर्वजंतूनां गौतमीतीरवासिनाम्‌ ॥६८॥
टीका ॥ ऊर्ध्वरेत मुनीश्वरांसी । कोटिवर्षे तपस्वियांसी । जे गति होय परियेसीं । ते स्नानमात्रें गौतमीच्या ॥६९॥
याकारणें गौतमीसी । आणावें यत्‍नें भूमंडळासी । सांकडें घालितां गौतमासी । आणितां गंगा आम्हां लाभ ॥७०॥
म्हणोनि रचिली माव एक । दुर्वेची गाय सवत्सक । करोनि पाठविली ऐक । गौतमाचे ब्रीहिभक्षणासी ॥७१॥
ऋषि होता अनुष्‍ठानीं । देखिलें धेनूसी नयनीं । निवारावया तत्क्षणीं । दर्भ पवित्र सोडिलें ॥७२॥
तेचि कुश जाहलें शस्‍त्र । धेनूसी लागलें जैसें वज्रास्त्र । पंचत्व पावली त्वरित । घडली हत्या गौतमासी ॥७३॥
मिळोनि समस्त ऋषिजन । प्रायश्चित्त देती जाण । गंगा भूमंडळीं आण । याविणें तुम्हां नाहीं शुद्धि ॥७४॥
याकारणें गौतमऋषीं । तप केलें सहस्त्र वर्षी । प्रसन्न झाला व्योमकेशी । वर माग म्हणितलें ॥७५॥
गौतम म्हणे सर्वेश्वरा । तुवां देशील मज वरा । उद्धरावया सचराचरा । द्यावी गंगा भूमंडळासी ॥७६॥
गौतमाचे विनंतीसी । निरोप दिधला गंगेसी । घेवोनि आला भूमंडळासी । पापक्षालनार्थ मनुष्यांचे ॥७७॥
ऐसी गंगाभागीरथी । कवणा वर्णावया सामर्थ्य । याचि कारणें श्रीगुरुनाथ । आले ऐक नामधारका ॥७८॥
ऐशी गौतमीतटाकयात्रा । श्रीगुरू आपण आचरीत । पुढें मागुती लोकानुग्रहार्थ । आपण हिंडे परियेसा ॥७९॥
तटाकयात्रा करितां देख । आले श्रीगुरु मंजरिका । तेथें होता मुनि एक । विख्यात 'माधवारण्य' ॥८०॥
सदा मानसपूजा त्यासी । नरसिंहमूर्ति परियेसीं । देखता झाला श्रीगुरुसी । मानसमूर्ति जैसी देखे ॥८१॥
विस्मित होऊनि मानसीं । नमिता झाला श्रीगुरुमूर्तीसी । स्तोत्र करी बहुवसी । अतिभक्तीकरुनियां ॥८२॥
श्र्लोक ॥ यद्दिव्यपादद्वयमेवसाक्षाद्‌ , अधिष्‍ठितं देवनदीसमीपे । य उत्तरे तीरनिवासिरामो, लक्ष्मीपतिस्त्वं निवसन्स नित्यम्‌ ॥८३॥
ओंव्या ॥ येणेंपरी श्रीगुरुसी । विनवी माधवारण्य हर्षी । श्रीगुरू म्हणती संतोषीं । तया माधवारण्यासी ॥८४॥
श्र्लोक ॥ अत्यंतमार्गस्थितिमार्गरुपं, अत्यंतयोगादधिकारतत्त्वम्‌ । मार्गं च मार्गं च विचिन्वतो मे, मार्गोदयं माधव दर्शये ते ॥८५॥
ओंव्या ॥ ऐसें श्रीगुरू तयासी आश्वासोनि म्हणती हर्षी । निजस्वरुप तयासी । दाविते झाले परियेसा ॥८६॥
श्रीगुरुचें स्वरुप देखोनि । संतोषी झाला तो मुनि । विनवीतसे कर जोडूनि । नानापरी स्तुति करी ॥८७॥
जय जया जगद्गुरू । त्रयमूर्तीचा अवतारू । लोकां दिससी नरु । परमपुरुषा जगज्ज्योति ॥८८॥
तूं तारक विश्वासी । म्हणोनि भूमीं अवतरलासी । कृतार्थ केलें आम्हांसी । दर्शन दिधलें चरण आपुले ॥८९॥
ऐसेपरी श्रीगुरुसी । स्तुति करी तो तापसी । संतोष होऊन अति हर्षी । आश्वासिती तया वेळीं ॥९०॥
म्हणती श्रीगुरू तयासी । सिद्धि झाली तुझ्या मंत्रासी । तुज सद्गति भरंवसीं । ब्रह्मलोक प्राप्त होय ॥९१॥
नित्यपूजा तूं मानसीं । करिसी नृसिंहमूर्तीसी । प्रत्यक्ष होईल परियेसीं । न करीं संशय मनांत ॥९२॥
ऐसें सांगोनि तयासी । श्रीगुरू निघाले परियेसीं । आले वासरब्रह्मेश्वरासी । गंगातीर महाक्षेत्र ॥९३॥
तया गंगातटाकांत । श्रीगुरू समस्त शिष्यांसहित । स्नान करितां गंगेंत । आला तेथें विप्र एक ॥९४॥
कुक्षिव्यथा असे बहुत । तटाकीं असे लोळत । उदरव्यथा अत्यंत । त्यजूं पाहे प्राण देखा ॥९५॥
पोटव्यथा बहु त्यासी । नित्य करी तो उपवासासी । भोजन केलिया दुःख ऐसी । प्राणांतिक होतसे ॥९६॥
याकारणें द्विजवर । सदा करी फलाहार । अन्नासी त्यासी असे वैर । जेवितां प्राण त्यजूं पाहे ॥९७॥
पक्षमासां भोजन करी । व्यथा उठे त्याचे उदरीं । ऐसा किती दिवसवरी । कष्‍टत होता तो द्विज ॥९८॥
पूर्व दिवसीं तया ग्रामीं । आला सण महानवमी । जेविला मिष्‍टान्न मनोधर्मी । मासें एक पारणें केलें ॥९९॥
भोजन केलें अन्न बहुत । त्याणें पोट असे दुखत । गंगातीरीं असे लोळत । प्राण त्वरित त्यजूं पाहे ॥१००॥
दुःख करी द्विज अपार । म्हणे गंगेंत त्यजीन शरीर । नको आतां संसार । पापरुपें वर्तत ॥१॥
अन्न प्राण अन्न जीवन । कवण असेल अन्नावीण । अन्न वैरी झालें जाण । मरण बरवें आतां मज ॥२॥
मनीं निर्धार करोनि । गंगाप्रवेश करीन म्हणोनि । पोटीं पाषाण बांधोनि । गंगेमध्यें निघाला ॥३॥
मनीं स्मरे कर्पूरगौर । उपजलों आपण भूमिभार । केले नाहीं परोपकार । अन्नदानादिक देखा ॥४॥
न करीं पुण्य इह जन्मांत । जन्मांतरीं पूर्वी शत । पुण्यफळ असे दिसत । मग हे कष्‍ट भोगीतसें ॥६॥
अपूर्ती पूजा ईश्वराची । केली असेल निंदा गुरुची । अवज्ञा केली मातापितयांची । मग हे कष्‍ट भोगीतसें ॥७॥
अथवा पूर्वजन्मीं आपण । केलें असेल द्विजधिक्कारण । अतिथि आलिया न घालीं अन्न । वैश्वदेवसमयासी ॥८॥
अथवा मारिलें वोवरांसी । अग्नि घातला रानासी । वेगळें सांडूनि जनकजननींसी । स्त्रियेसहित मी होतों ॥९॥
मातापिता त्यजोनियां । असों सुखें जेवूनियां । पूर्वार्जवापासोनियां । मग हे कष्‍ट भोगीतसें ॥११०॥
ऐसीं पापें आठवीत । विप्र जातो गंगेंत । तंव देखिलें श्रीगुरुनाथें । म्हणती बोलावा ब्राह्मणासी ॥११॥
आणा आणा त्या ब्राह्मणासी । प्राण त्यजितो कां सुखेसीं । आत्महत्या महादोषी । पुसों कवण कवणाचा ॥१२॥
श्रीगुरुवचन ऐकोनि । गेले शिष्य धांवोनि । द्विजवरातें काढोनि । आणिलें श्रीगुरुसन्मुख ॥१३॥
अनाथासी कल्पतरु । दुःखिष्‍टासी कृपासागरू । पुसतसे श्रीगुरू । तया दुःखिष्‍ट विप्रासी ॥१४॥
श्रीगुरू म्हणती तयासी । प्राण कां गा त्यजूं पाहसी । आत्महत्या महादोषी । काय वृत्तांत सांग आम्हां ॥१५॥
विप्र म्हणे गा यतिराया । काय कराल पुसोनियां । उपजोनि जन्म वायां । भूमिभार जाहलों असें ॥१६॥
मास-पक्षां भोजन करितों । उदरव्यथेनें कष्‍टतों । साहूं न शकें प्राण देतों । काय सांगूं स्वामिया ॥१७॥
आपणासी अन्न वैरी असतां । केवीं वांचावें गुरुनाथा । शरीर सर्व अन्नगता । केवीं वांचूं जगद्गुरु ॥१८॥
श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी । तुझी व्यथा गेली परियेसीं । औषध असे आम्हांपासीं । क्षण एकें सांगों तुज ॥१९॥
संशय न धरीं आतां मनीं । भिऊं नको अंतःकरणीं । व्याधि गेली पळोनि । भोजन करी धणीवरी ॥१२०॥
श्रीगुरुवचन ऐकोनि । स्थिर झाला अंतःकरणीं । माथा ठेवूनि श्रीगुरुचरणीं । नमन केलें तया वेळीं ॥२१॥
इतुकिया अवसरीं । तया ग्रामींचा अधिकारी । विप्र एक अवधारीं । आला गंगास्नानासी ॥२२॥
तंव देखिलें श्रीगुरुसी । येऊनि लागला चरणांसी । नमन केलें भक्तीसीं । मनोवाक्कायकर्मे ॥२३॥
आश्वासोनि तये वेळीं । पुसती श्रीगुरू स्तोममौळी । कवण नाम कवण स्थळीं । वास म्हणती तयासी ॥२४॥
ऐकोनि श्रीगुरुचें वचन । सांगतसे तो ब्राह्मण । गोत्र आपलें कौंडिण्य । आपस्तंब शाखेसीं ॥२५॥
नाम मज 'सायंदेव' असे । वास-स्थळ आपलें 'कडगंची'स । आलों असे उदरपूर्तीस । सेवा करितों यवनाची ॥२६॥
अधिकारपणें या ग्रामीं । वसों संवत्सर ऐका स्वामी । धन्य धन्य झालों आम्ही । तुमचे दर्शनमात्रेसीं ॥२७॥
तूं तारक विश्वासी । दर्शन दिधलें आम्हांसी । कृतार्थ झालों भरंवसीं । जन्मांतरींचे दोष गेले ॥२८॥
तुझा अनुग्रह होय ज्यासी । तरेल या भवार्णवासी । अप्रयत्‍नें आम्हांसी । दर्शन दिधलें स्वामिया ॥२९॥
श्र्लोक ॥ गंगा पापं शशी तापं दैन्यं कल्पतरुस्तथा । पापं तापं च दैन्यं च हरेच्छ्रीगुरुदर्शनम्‌ ॥१३०॥
टीका ॥ गंगा देखितांचि पापें जाती । चंद्रदर्शनें ताप नासती । कल्पतरुची ऐसी गति । दैन्यवेगळा करी जाण ॥३१॥
तैसे नव्हती तुमचे दर्शनगुण । पाप-ताप दैन्यहरण । देखिले आजि तुमचे चरण । चतुर्वर्गफल पावलों ॥३२॥
ऐशी स्तुति करुनि । पुनरपि लागला श्रीगुरुचरणीं । जगद्गुरु अश्वासोनि । निरोप देती तया वेळीं ॥३३॥
श्रीगुरू म्हणती तयासी । आमुचें वाक्य परियेसीं । जठरव्यथा ब्राह्मणासी । प्राणत्याग करीतसे ॥३४॥
उपशमन याचे व्याधीसी । सांगों औषध तुम्हांसी । नेवोनि आपुले मंदिरासी । भोजन करवीं मिष्‍टान्न ॥३५॥
अन्न जेवितां याची व्यथा । व्याधि न राहे सर्वथा । घेऊनि जावें आतां त्वरिता । क्षुधाक्रांत विप्र असे ॥३६॥
ऐकोनि श्रीगुरुचें वचन । विनवीतसे कर जोडून । प्राणत्याग करितां भोजन । या ब्राह्मणासी होतसे ॥३७॥
जेविला काल मासें एका । त्याणें प्राण जातो ऐका । अन्न देतां आम्हांसी देखा । ब्रह्महत्या त्वरित घडेल ॥३८॥
श्रीगुरु म्हणती सायंदेवासी । आम्ही औषधी देतों यासी । अपूपान्न-माषेसीं । क्षीरमिश्रित परमान्न ॥३९॥
अन्न जेवितां त्वरितेसीं । व्याधि जाईल परियेसीं । संशय न धरीं तूं मानसीं । त्वरित न्यावें गृहासी ॥१४०॥
अंगीकारोनि तया वेळीं । माथा ठेवी चरणकमळीं । विनवीतसे करुणाबहाळी । यावें स्वामी भिक्षेसी ॥४१॥
अंगीकारोनि श्रीगुरुनाथ । निरोप देती हो कां त्वरित । सिद्ध म्हणे ऐक मात । नामधारक शिष्योत्तमा ॥४२॥
आम्ही होतों तये वेळीं । समवेत-शिष्य सकळीं । जठरव्यथेचा विप्र जवळी ; । श्रीगुरू गेले भिक्षेसी ॥४३॥
विचित्र झालें त्याचे घरीं । पूजा केली परोपरी । पतिव्रता त्याची नारी । 'जाखाई' म्हणिजे परियेसा ॥४४॥
पूजा करिती श्रीगुरुसी । षोडशोपचारें परियेसीं । तेणेंचि रीतीं आम्हांसी । शिष्यां सकळिकां वंदिलें ॥४५॥
श्रीगुरुपूजा-विधान । विचित्र केलें अतिगहन । मंडळ केलें रक्तवर्ण । एकेकासी पृथक्‌-पृथक्‌ ॥४६॥
पद्म रचूनि अष्‍टदळी । नानापरीचे रंगमाळी । पंचवर्ण चित्रमाळी । रचिली तियें परियेसा ॥४७॥
चित्रासन श्रीगुरुसी । तेणेंचिपरी सकळिकांसी । मंडळार्चनविधीसीं । करिती पुष्पगंधाक्षता ॥४८॥
संकल्पोनि विधीसीं । नमन केलें अष्‍टांगेसीं । माथा ठेवूनि चरणीं, न्यासी । पाद सर्वही अष्‍टांगीं ॥४९॥
षोडशोपचार विधीसीं । पंचामृतादि परियेसीं । रुद्रसूक्तमंत्रेसीं । चरण स्नापिले तये वेळीं ॥१५०॥
श्रीगुरुचरणीं अतिहर्षी । पूजा करीत षोडशी । तया विप्रा ज्ञान कैसी । चरणतीर्थ धरिता झाला ॥५१॥
तया चरणतीर्थासी । पूजा करीत भक्तीसीं । गीतवाद्यें आनंदेसीं । करी आरति नीरांजन ॥५२॥
अनुक्रमें श्रीगुरुपूजा । करिता झाला विधिवोजा । पुनरपि षोडशोपचारें पूजा । करीतसे भक्तीनें ॥५३॥
अक्षय वाणें आरति । श्रीगुरुसी ओंवाळिती । मंत्रघोष अतिभक्तीं । पुष्पांजळी करिता झाला ॥५४॥
अनेकपरी गायन करी । नमन करी प्रीतिकरीं । पतिव्रता असे नारी । पूजा करिती उभयवर्ग ॥५५॥
ऐसेपरी श्रीगुरुसी । पूजा केली परियेसीं । तेणेंचि विधीं शिष्यांसी । आम्हां समस्तांसी वंदिलें ॥५६॥
संतोषोनि श्रीगुरुमूर्ति । वर देती अतिप्रीतीं । तुझी संतती होईल ख्याति । गुरुभक्ति वंशोवंशीं ॥५७॥
तूं जाणसी गुरुचा वास । अभिवृद्धि होय वंशोवंश । पुत्रपौत्रीं नांदाल हर्षी । गुरुभक्ति येणेंपरी ॥५८॥
ऐसें बोलोनि द्विजासी । आशीर्वचन देती अतिहर्षी । नमन करुनि श्रीगुरुसी । ठाय घातले तये वेळीं ॥५९॥
नानापरीचें पक्क्वान्न । अपूपादि माषान्न । अष्‍टविध परमान्न । शर्करासहित निवेदिलें ॥१६०॥
शाक पाक नानापरी वाढताति सविस्तारीं । भोजन करिती प्रीतिकरीं । श्रीगुरुमूर्ति परियेसा ॥६१॥
जठरव्यथेच्या ब्राह्मणें । भोजन केलें परिपूर्ण । व्याधि गेली तत्क्षण । श्रीगुरूचे कृपादृष्‍टीनें ॥६२॥
परीस लागतां लोहासी । सुवर्ण होय परियेसीं । दर्शन होतां श्रीगुरुसी । व्याधि कैंची सांग मज ॥६३॥
उदय जाहलिया दिनकरासी । संहार होतो अंधकारासी । श्रीगुरुकृपा होय ज्यासी । दैन्य कैंचें तया घरीं ॥६४॥
ऐसेपरी श्रीगुरुनाथें । भोजन केलें शिष्यासहित । आनंद झाला तेथें बहुत । विस्मय करिती सकळै जन ॥६५॥
अभिनव करिती सकळ जन । द्विजासी वैरी होतें अन्न । औषध झालें तेंचि अन्न । व्याधि गेली म्हणताति ॥६६॥
सिद्ध म्हणे नामधारकास । श्रीगुरुकृपा होय ज्यास । जन्मांतरींचे जाती दोष । व्याधि कैंची त्याचे देहीं ॥६७॥
गंगाधराचा नंदन । सरस्वती सांगें विस्तारोन । गुरुचरित्र कामधेनु । ऐका श्रोते एकचित्तें ॥६८॥
जे ऐकती भक्तीनें । व्याधि नसती त्यांचे भुवना । अखिल सौख्य पावती जाणा । सत्यं सत्यं पुनः सत्यं ॥६९॥
इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंहसरस्वत्युपाख्याने सिद्ध-नामधारकसंवादे करंजनगराभिगमनं तथा विप्रोदरव्यथानिरसनं नाम त्रयोदशोऽध्यायः ॥१३॥
॥ ओंवीसंख्या १६९ ॥
श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु

No comments:

Post a Comment